आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)
ही जगातील सर्वात मोठी पूर्णपणे सरकारी अर्थसहाय्यित आरोग्य विमा योजना आहे. याचा मुख्य उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना गंभीर आजारांसाठी मोफत आणि कॅशलेस उपचार पुरवणे हा आहे.
लाभार्थी:
महाराष्ट्रातील पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबे यासाठी पात्र आहेत. •७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता स्वतंत्रपणे या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे (उत्पन्नाची अट नाही).
फायदे:
1.विमा संरक्षण: प्रति कुटुंब, प्रति वर्ष ₹ ५,००,०००/- पर्यंतचे मोफत उपचार. 2.उपचारांची व्याप्ती: यात १,९०० हून अधिक उपचार आणि शस्त्रक्रियांचा समावेश आहे. 3.कॅशलेस सुविधा: रुग्णालयात भरती झाल्यापासून ते डिस्चार्जपर्यंतचा सर्व खर्च (औषधे, चाचण्या, शस्त्रक्रिया) मोफत.
अर्ज कसा करावा
.पोर्टेबिलिटी: देशातील कोणत्याही ‘एम्पॅनेल’ (Empaneled) केलेल्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेता येतात.